मकाई. साखर कारखाना निवडणुकीत वीट गावामध्ये 75 टक्के मतदान बागल गटाचा उमेदवाराचा विजय होण्याचा देवा ढेरे यांचा दावा
करमाळा प्रतिनिधी मकाई. साखर कारखाना निवडणुकीत वीट गावामध्ये 75 टक्के मतदान झाले असून बागल गटाच्या उमेदवाराचा विजय होण्याचा दावा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा ढेरे यांनी केला आहे मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वीट गावामध्ये 406 मता पैकी 305 असे 75 टक्के मतदान झाले आहे.बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांचे नेतृत्वाखाली बागल गटाला मानणारे गाव असुन शेतकरी सभासद यांच्या पाठबळावर बागल गटाच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. वीट गावामध्ये बागलप्रेमी नेते कार्यकर्ते यांनी मतदानासाठी अथक परिश्रम घेतले असून मतदान समाधानकारक झाले असुन मताचा वाढलेला टक्का हा बागल गटाच्या विजयाला मताधिक्य देणारा असल्याने बागल गटाचे उमेदवार मताधिक्याने विजय होतील असा दावा देवा ढेरे यांनी केला आहे.


