करमाळा

*,दहिगाव योजनेचे पाणी साडे, नेरले तलावात साडे, सालसे, वरकुटे, आळसुंदे नेरलेतील ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश-औदुंबरराजे भोसले

 

करमाळा प्रतिनिधी

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडण्यात आल्याची माहिती नेरलेचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिली.
उजनीचे ओव्हर फ्लोचे पाणी दहिगाव उपसा सिंचन योजने मार्फत साडे, सालसे, वरकुटे, नेरले या परिसराला सोडावे तसेच नेरले तलाव भरावा या मागणीसाठी दि. २३ ऑगस्ट रोजी अळसुंदे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. पाणी सोडण्यात आल्याने आंदोलनाला यश आल्याचे भोसले यांनी सांगितले.
दहिगाव योजनेचे पाणी नेरले तलावात येण्यासाठी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी कुकडी डावा कालवा उपविभागाचे अभियंता आवताडे,सोहम कांबळे यांना नेरले तलाव भरण्याची सूचना केल्या होत्या.

पाणी सोडण्यात आल्याने समाधान आहे. पोलिसांनी ४० आंदोलकांवर रस्ता अडवण्याचे कारण देत खोटा गुन्हा दाखल केला. आतापर्यंत तालुक्यात कोणत्याही आंदोलनानंतर असे झाले नाही. कोणाच्यातरी सांगण्याने गुन्हे दाखल करण्यात आले.
-औदुंबरराजे भोसले, माजी सरपंच
सोहम कांबळे यांना नेरले तलाव भरण्याविषयी सूचना केल्या होत्या. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता तलावासाठी पाणी सोडण्यात आले. या पाण्याचे पूजन भोसले यांच्यासह राणा महाराज वाघमारे, जोतिराम घाडगे, सरपंच संजय गुरव प्रा. शहाजी घाडगे, युवा नेते चंद्रकांत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!