अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी इतर वेळेचे आकडेवारीचे निकष न लावता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य अशी नुकसान भरपाई तातडीने द्यावी -दिग्विजय बागल
करमाळा (प्रतिनिधी)- अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी इतर वेळेचे आकडेवारीचे निकष न लावता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य अशी नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुंगशी तालुका माढा येथे पाहणी दौऱ्याच्या वेळी बोलताना मागणी केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी शासनाच्या वतीने घेण्यात येईल असे यावेळी सांगितले.
करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले असून शेतातील पिकासह काही ठिकाणी शेतीमधील माती वाहून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशावेळी इतर भरपाईचे निकष न लावता सरसकट पंचनामे करून झालेल्या नुकसानीची योग्य अशी भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे. यावेळी बागल यांनी उपमुख्यमंत्र्यांबरोबर मुंगशी या ठिकाणी पाहणी केली उपमुख्यमंत्री या परिसरातून गेल्यानंतर परिसरात नुकसान झालेल्या शिंगेवाडी गावांमध्येही जाऊन नुकसानीची पाहणी करत त्या ठिकाणच्या लोकांशी संवाद साधला व त्यांना धीर दिला यावेळी अनेक शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले त्यांनी आपल्या व्यथा बागल यांच्यासमोर मांडल्या सर्वच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेपर्यंत आपण याबाबतीत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी त्यांच्यासोबत श्री.मकाईचे संचालक सतीश निळ भाजपा अध्यक्ष सचिन पिसाळ यांच्यासह या भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.


