करमाळा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीसाठी शासन कटीबद्ध : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील अतिगृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार असून शासन मदतीसाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना संजय शिरसाट यांनी दिली . करमाळा बाजार समितीमधे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणेसाठी आयोजीत मेळाव्यामधे ते बोलत होत होते .यावेळी खा धैर्यशील मोहिते – पाटील, आ नारायण आबा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप उपस्थित होते . ना शिरसाट यांनी करमाळा तालुक्यातील सरपडोह, बिटरगाव या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या . उपस्थित अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले .त्यानंतर करमाळा येथे बाजार समितीने केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले . या प्रसंगी आयोजीत शेतकरी मेळाव्यात खा धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, शंभूराजे जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळणेसह मतदारसंघातील प्रलंबीत विकासकामांना मान्यता व निधीची मागणी केली . यावर सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांनी खा . मोहिते पाटील, आ .पाटील व माजी आ .जगताप यांना उद्देशून सामाजिक न्याय खात्याशी निगडीत प्रस्ताव तातडीने दाखल करा अवघ्या आठच दिवसांत ५० ते ६० कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देतो अशी घोषणा केली . तसेच करमाळा बाजार समितीने स्वनिधीतून केलेले रस्ते क्राँक्रिटीकरण व अन्य सोयी सुविधांची माहिती घेवून समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले .यावेळी महिला नेत्या सवितादेवी राजेभोसले, युवासेनेचे सागर पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप, अमोद संचेती, आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, प्रशांत ढाळे, आल्ताफ तांबोळी, श्रेणीक खाटेर, धुळाभाऊ कोकरे , जालिंदर पानसरे, महादेव कामटे, नागनाथ लकडे, तात्यासाहेब शिंदे, औदुंबर मोरे, जनार्धन नलवडे, सागर दोंड, बबनराव मेहेर , महादेव डुबल, वैजीनाथ कदम, दादासाहेब लबडे , अहमद कुरेशी, बाळासाहेब बलदोटा, मुख्याधिकारी सचिन तपासे, विशेष लेखापरीक्षक सुनील काळे यांचेसह बाजार समिती व आदिनाथ कारखान्याचे आजी – माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, गट सचिव ,शेतकरी व्यापारी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रा . दत्तात्रय भागडे यांनी केले . आभार युसूफ शेख यांनी मानले . कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!