करमाळा शहरवासीयांचा कल जगताप गटांसाठी अनुकूल,आता उत्कंठा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कुटुंबातील? कि संधी कार्यकर्त्यांला? उत्सुकता शिगेला पोहोचली
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगर परिषदेच्या गेली तीस वर्षाच्या राजकीय इतिहासाचे अवलोकन केले असता शहरवासीयांची पसंती अथवा कल जगताप गटाकडे असल्याचेच वेळोवेळी झालेल्या निवडणुकातून दिसून आले आहे .थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत सन २००१ साली जगताप गटाच्या सौ सुनिता वाशिंबेकर व सन २०१६ साली श्री वैभव जगताप हे विजयी झाले होते . जगताप गट कधी स्वतंत्रपणे तर कधी स्थानिक पातळीवर सावंत गट व नागरिक संघटना अथवा बागल गटाबरोबर देखील आघाडी करून पालिकेच्या राजकारणात मुख्य केंद्रस्थानी राहिला आहे . मा आ श्री जयवंतराव जगताप यांची निरुपद्रवी, जातीपाती विरहित, दहशतवाद मुक्त सामाजिक स्वास्थ्य टिकविण्याची भूमिका असलेले समाज कारण -राजकारण यामुळे शहरातील नागरिकांचा श्री जगताप यांचे नेतृत्वावर विश्वास असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे . गिरधरदास देवी यांच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घकाळ सत्तेत असणाऱ्या नागरिक संघटनेची सत्ता उलटवून तत्कालीन आमदार जयवंतराव जगताप यांचे नेतृत्वाखाली जगताप गटाने नगरपालिका मध्ये सत्ता हस्तगत केली .ती २०२१ पर्यंत अबाधित आहे .गेली ४ वर्षापासून नगरपरिषदेमध्ये प्रशासकराज आहे .खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्ष पद असताना मुस्लिम समाजातील शौकत नालबंद यांना श्री जयवंतराव जगताप यांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिली होती .जगताप गटाचे नेतृत्वा खालील नगरपरिषदेच्या सत्ता काळात ॲड डी पी जगताप, सुशीला आगलावे ,ज्ञानेश्वर मोरे ,पुष्पा फंड ,विद्या चिवटे ,अमोदकुमार संचेती,दीपक ओहोळ प्रशांत ढाळे (प्रभारी )आदींनी नगराध्यक्ष पद भूषविले आहे . आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी थेट जनतेतून होणाऱ्या नगराध्यक्षपदी पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी जाहीर झाले आहे . माआ श्री जयवंतराव जगताप आता जगताप कुटुंबातील महिलेला नगराध्यक्ष पदाचे निवडणुकीत रिंगणात उतरवणार कि एखाद्या सक्षम कार्यकर्त्याला संधी देणार याची उत्कंठा शिगेला पोचली आहे . माजी आमदार जगताप यांनी त्यांच्या राजकीय जीवनात बऱ्याच वेळा राजकीय धक्का तंत्राचा अवलंब करीत मुत्सद्देगिरीने निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे श्री .जगताप यांच्या निर्णयावरच पुढील सर्व राजकीय समीकरणे अवलंबून आहेत .


