Sunday, August 2, 2026
करमाळासकारात्मकसामाजिक

जेऊर रेल्वेस्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा  भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दिपक चव्हाण यांची मागणी

 

करमाळा  प्रतिनिधी :

 करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे जेऊर  रेल्वे स्थानक आहे, या रेल्वेस्थानकावर अनेक गाड्या थांबतात परंतु हुतात्मा एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस याही गाड्यांना या स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापुर यांच्याकडे माजी मंत्री तथा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक चव्हाण यांनी दिली.याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून निश्चितपणे जेऊर येथे हुतात्मा एक्सप्रेसला येत्या काही दिवसामध्ये थांबा मिळावण्यासाठ प्रयत्नशील राहू, असे मतविभागीय रेल्वे विभागीय व्यवस्थापक सोलापूर यांनी व्यक्त केले. ही गाडी थांबल्यास पुणे, मुंबई, सोलापूर जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. 

करमाळा तालुक्यासह जामखेड, कर्जत, परांडा या परिसरातील प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच केम येथे हैदराबाद -मुंबई व चेन्नई -मुंबई या रेल्वे गाडी ना पूर्वीचा थांबा कायम करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नरेंद्रसिंह ठाकूर व आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!