करमाळाराजकीय

वडशिवणे ग्रामपंचायतीवर बागल गटाची एक हाती सत्ता राजकारणात बागलगटाचे वर्चस्व कायम

करमाळा प्रतिनीधी वडशिवणे ग्रामपंचायतच्या बागल गटानी सात जागावर विजय मिळवुन एकहाती सत्ता मिळवली आहे.वडशिवणे ग्रामपंचायतीची मतमोजणी पाचव्या फेरीत होती. नऊ जागांसाठी येथे निवडणूक झाली. तीन प्रभागात येथे उमेदवार रिंगणात होते. बागल गट विरुद्ध जगताप गट अशी येथे लढत झाली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या ग्रामपंचायतीवर बागल गटाचे वर्चस्व राहिले आहे. येथे बागल गटाला सात तर जगताप गटाला दोन जागा मिळाल्या आहेत.
बागल गटाकडून राजश्री जगदाळे, शारदा साळुंखे, उषा जगदाळे, कमल वाघमारे, अमोल उघडे, विशाल जगदाळे, रुपाली देवकर हे विजयी झाले आहेत. तर जगताप गटाचे रत्नाकर कदम व प्रसाद पाटक हे दोघेही एकजण 1 तर दूसरा उमेदवार 3 मताने विजयी झाले आहेत. येथे पराभूत झालेले बागल गटाचे उमेदवार यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. त्यानंतर तहसीलदार समीर माने यांनी मागणीचा विचार करून फेर मतमोजणी करण्यास सांगितले. मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला. यावेळी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल हे स्वतः मत मोजणीच्या ठिकाणी आले होते. बागल गटाने या निम्मिताने राजकारणात आपले वर्चस्व सिध्द केले आहे. कार्यालयात मतमोजणी सुरु होती
चार टेबलवर आठ फेऱ्यांमध्ये तहसीलदार समीर माने यांच्या नियंत्रणाखाली ही मतमोजणी झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group